धर्मं ......
मध्यन्तारी Discovery वर ९/११ चा episode दाखवला. वीमाने hijack करून, थंड माथ्याने सगळा कट पुर्नत्वास नेला गेला. कुठलीही दया माया न दाखवता लोकांचे प्राण घेतले गेले आणि हे सर्व का? तर कुणी तरी या कार्याला देवाचं कार्य
असं सांगितलं म्हणून.
पण हे सर्व का घडतं हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. लोक का म्हणुन दुसर्यांच्या जीवावर उठातात? का म्हणुन स्वताहाला, स्वतःच्या धर्माला श्रेष्ठ माणून दुसर्यांच्या धर्माला शूद्र लेखतात ह्याचा विचार व्हायला हवा. नाहीतर हे असच चालू राहील, मनुष्य प्रजातीचा अंत होईस्तोवर.
फार पुर्वी धर्मं कीवा कुठलेच बंधन वा नियम अस्तित्वात नसावेत. लोक समूहात रहायची पण कुठल्याही गोष्टीची वाटणी झालेली नव्हती. काहीच कुणाच्या असं मालकीचं नव्हतं. खर तर त्या जाणिवाच अस्तीत्वात नसाव्या. मग हळु हळु लोकांना गोष्टींवर स्वतःची मालकी असावी असं
वाटू लागलं. बलवानांना त्यांची मर्जी चालावी, शब्द चालावा अशी इच्छा झाली. भांडणं वाढली, असंतोष वाढला. मग हळुहळु नीयम आले, बंधनं आली, कामाची आणि वस्तुंची वाटणी झाली. आणि समुहाचे गट पडले. त्या गटांना बांधून ठेवायला काही सुध्न्य लोकांनी त्या त्या गटांचे आणि तसेच समुहाचे असे काही कर्तव्य नेमून दीले आणि जसे ते समूह मोठे होत गेले, प्रत्येकाने नियमावली, रिती पळाव्या म्हणुन त्याला कुठल्या तरी आदीशक्तीच्या इच्छेचं नाव दीलं. आणि मग तो धर्म झाला. समुहा समुहांचे नियम वेगळे त्यामुळे धर्म वेगळे झाले.
पण शक्तिमान आणखी शक्तिमान होत गेले.
लोकांनी आपण होऊन दिलेलं पुढरीपण हे हक्काच वाटायला लागलं. आपणच काय ते लोकांचे कैवारी हा भ्रम आणि समज
निर्माण झाला. आणि इथेही ह्या लोकांना धर्म कामी आला. मग पुढे जाऊन लोकांनी धर्मांचीच भाषा बदलली. इथे पृथ्वी तळावर राहून त्यांना आकाशतल्या
देवाच्या जास्त जवळ जाण्याचे मार्ग कळले आणि स्वर्ग, नरक यांचे नियम लक्षात आले. धर्म लोकांना घाबरवून कह्यात ठेवण्याचा मार्ग झाला.
आणि धर्मप्रसार एक महत्वाचं हत्यार बनलं. आणि मग सुरु झाला संघर्ष धर्मांचा. खरं तर माणसांच्याच हव्यासाचा. आणि त्यात मराली जाऊ लागली तीही माणसेच.
हा नरसंहार आजतागायत सुरू आहे. भाषा
बदलली, मार्ग बदलले. कधी उघडपणे तर कधी आडमार्गाने हा नरसंहार आजही घडवून आणला जातो
आहे. कारण हा धर्म भेद आणि ही तेढ जीवंत ठेवणे
काही संस्था, काही लोक यांच्या अस्तित्वासाठी खूप महत्वाची आहे.
Comments
Post a Comment